मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२२ नोव्हें.) रात्री ८ वाजता फेसबुक लाईव्ह मार्फत महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला कोरोना संबंधित सुरक्षेच्या उपायांचे पालन करणे गरजेचे असल्याचा संदेश दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :
- दुसऱ्या लाटेत तरुणांना देखील संक्रमण होत आहे. लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
- कोविड होऊन गेल्यानंतर त्याचे दुष्परिणाम होत आहेत. पोस्ट कोव्हीड गंभीर आहे,त्याची देखील काळजी घ्या.
- लस आल्यावर त्याचा पाहिले आणि दुसरा डोस द्यावा लागणार आहे.
- राज्यात सुमारे १२ कोटी जनता आहे. त्यामुळे लशीचे २४ कोटी डोस द्यावे लागणार आहेत.
- लस कोणत्या तापमानात ठेवायची?कशी ठेवायची? हे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत.
- तोपर्यंत मास्क घाला,हात धुवा,अंतर पाळा हीच त्रिसूत्री पाळायला हवी.