मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की ‘अगोदर हॉस्पिटलची स्वछता कारायला हवी.कोरोनाविरुद्ध लढाई आपल्याला लढायची आहे. त्यामुळे कामगाराची कोरोना ची चाचणी देखील करणे गरजेचे आहे.
राज्यात आज ६४०६ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन ४८१५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १६६८५३८ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ८५९६३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९२.५७% झाले आहे.
हि माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून ट्विट करत दिली आहे.