Marathwada Sathi

आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टरचे केले कौतुक…!

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : जगभर कोरोनाचा विषाणूचा कहर सुरू असला नव्या करोना विषाणूचा एकही रुग्ण राज्यात आतापर्यंत आढळलेला नसल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं ब्रिटनमधून येणारी विमाने देशात सर्वात अगोदर महाराष्ट्राने थांबविली, त्यानंतर केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे.

आतापर्यंत केलेल्या तपासणीमध्ये रूपांतरित झालेल्या करोना विषाणूचा एकही रुग्ण आढळून आला नाही.राज्यात दुसरी लाट थांबविण्यात प्रशासनाला यश आले असल्याचा दावाही टोपे यांनी केला. कोविडच्या महासंकटातही एमआयटी हॉस्पिटलमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या. त्यामुळे रुग्णांना जीवदान मिळाले. मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या औरंगाबाद मधील एमआयटीच्या डॉक्टराचे आरोग्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे.

Exit mobile version