मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : भारतात कोरोना रोगाचा प्रसार वाढत असल्याने मुंबईत पुन्हा सरकारने नाईट कर्फ्यू लागू केला आहे. काल रात्रीपासून त्याची कठोर अंमलबजावणी सुरू होती.५ जानेवारीपर्यंत हा कर्फ्यू लागू असेल. रात्री ११ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत कडकडीत कर्फ्यू असेल. एकीकडे कोरोनाचे संकट वाढत आहे.
दुसरीकडे युरोपात पसरत असलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची भीती आहे. त्यातच नाताळ आणि न्यू इयर सेलिब्रेशनच्या मूडमध्ये नागरिक आहेत. त्यामुळे कोणत्याही स्थितीत कोरोनाचा फैलाव पुन्हा होऊ नये म्हणून उत्साहाला आळा घालण्यासाठीच नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. पोलिसांनी काल रात्रीपासून मुंबईत अनेक भागात नाकाबंदी आणि पेट्रोलिंग करत कर्फ्यूची कडक अंमलबजावणी केली.