Home औरंगाबाद अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या…!

अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या…!

581
0

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : उच्च शिक्षणासाठी शहरात आलेल्या तरुणाने नैराश्यात स्वतःच्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद मध्ये घडली आहे. नागेश्वरवाडी भागात राहत्या खोलीतील बाथरूममध्ये गळफास घेऊन या मुलानेआत्महत्या केल्याची घटना गुरुवारी(२१ जाने.)सकाळी उघडकीस आली.सागर पोपटराव पोळ(वय २२, रा.पोळशंकरपूर,गंगापूर, ह.मु नागेश्वरवाडी,औ.बाद)असे मृत तरुणाचे नाव असून कौटुंबिक वादानंतर नैराश्य आल्याने त्याने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी सागर शहरात आला असून तो नागेश्वरवाडी भागातील एका खोलीत राहत होता.काही दिवसांपासून सागरच्या घरात वाद सुरू होते.त्यामुळे त्याला नैराश्य आले.त्यानंतर घरच्यांनी त्याची समजूत देखील काढली होती.मात्र,गुरुवारी(२१ जाने.) सकाळी गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली.

दरम्यान,या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार डी. जे. शिंदे हे तपास करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here