Marathwada Sathi

कोरोना लसीकरणास सुरूवात झाली….!

औरंगाबादः देशभरात आजपासून कोरोना लसीकरणास सुरूवात झाली असून औरंगाबादेत बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र वैद्य यांना पहिली लस घेण्याचा मान मिळाला आहे.राज्याचे उद्योगमंत्री आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत आज औरंगाबादेत कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. यावेळी खा. भागवत कराड, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय आणि महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर उपस्थित होते.
आम्ही नेहमीच सर्वांना लस देतो. मात्र कोरोना लसीविषयी लोकांच्या मनात कोणतीही शंका राहू नये म्हणून आम्ही डॉक्टरांनी पहिल्यांदा लस टोचून घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आम्ही लस टोचून घेतली आहे. औरंगाबादेत कोरोनाची पहिली लस घेण्याचा मान मला मिळाला आहे, असे डॉ. राजेंद्र वैद्य यांनी सांगितले.
लस घेतल्यानंतर पंधरा मिनिटे झाली तरी आपणाला कोणताही त्रास झालेला नाही. मात्र लस घेतली तरी सर्व नियमांचे पालन करा. मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंग आणि हाताचे सॅनिटायजेशन करणे या गोष्टींची खबरदारी घ्या, असेही डॉ. वैद्य म्हणाले.

Exit mobile version