मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : मुंबई शहर थंडीचा जोर वाढणार आहे. भारतीय हवामान विभागाने माहिती दिली आहे.उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीचा जोर वाढणार आहे.पुढचे दोन ते तीन दिवस मुंबईत थंडीचा मुक्काम असणार आहे. तापमानात घट होणार आहे. उत्तर भारतात थंडी आहे.याचा परिणाम हा पुढील काही दिवस दिसून येणार आहे.तापमानात घट होणार असल्याने पुढील दोन ते तीन दिवस आणखी तापमानात घट होऊन थंडीत वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.त्यामुळे पुन्हा गुलाबी थंडी वाढणार आहे.