Marathwada Sathi

भयानक! जादूटोण्याच्या संशयावरून जिवंत जाळले

पतीच्या मृत्यूचा बदल म्हणून पत्नीने जिवंत जाळले – तेलंगणा येथील मंदिरातील भयानक घटना

तेलंगणा : जादूटोणा केल्याच्या संशयावरून तेलंगणात एक धक्कादायक प्रकार घडला. येथील बळवंत नगर जिल्ह्यातील जगतीलाल गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला त्याच्या दूरच्या नातेवाईकांनी जिवंत जाळले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबाद येथे राहणारा पवन कुमार हा इंजिनिअर असून त्याला खुर्चीवर बांधण्यात आले. त्यानंतर त्याला जिवंत जाळण्यात आले. पवन कुमारला त्याच्या चुलत भावाच्या घरी खोटं सांगून घेऊन जाण्यात आले, त्यानंतर हा सर्व प्रकार घडला. पवन कुमार बंगळुरूतील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होता.या प्रकरणात जगनची पत्नी आणि भावाला अटक करण्यात आली आहे. पोलीस सध्या या दोघांची कसून चौकशी करत आहेत. या घटनेत किती लोकांचा सहभाग आहे, याचा शोध सध्या घेतला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परस्पर वाद झाल्यावर पवननं काही महिन्यांपूर्वी जगनला जिवे मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान, 12 दिवसांपूर्वी जगनचा हदयविकाराचा तीव्र झटक्यानं मृत्यू झाला. मात्र पवननं जादूटोणा करून जगनला मारल्याच्या त्य़ाच्या पत्नीचा संशय होता. आपल्या पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जगनच्या पत्नीनं पवनला घरी बोलवलं. कुटुंबियांचं सांत्वन करण्याच्या उद्देशानं पवन जगनच्या घरी गेला. त्यानंतर त्याला मंदिरात घेऊन गेले आणि जगनच्या पत्नीनं त्याला खुर्चीवर बांधले, पवनला जिवंत जाळण्यात आले.सायंकाळी, स्थानिकांनी किंचाळण्याचा आवाज ऐकून मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र मंदिराचे दार बंद करण्यात आले होते. जेव्हा स्थानिकांनी टाळं तोडून मंदिरात प्रवेश केला, तेव्हा पवन कुमारचा मृतदेह खुर्चीवर जळलेल्या अवस्थेता दिसला. पोलीस सध्या या प्रकरणात कोणा-कोणाचा सहभाग होता, याचा शोध घेत आहेत.

Exit mobile version