Home नाशिक भाजपचे ठाकरेंना ‘आव्हान’…!

भाजपचे ठाकरेंना ‘आव्हान’…!

586
0

मराठवाडा साथी न्यूज

नाशिक : आज(८ डिसें.)केंद्र शासनाच्या कृषी कायद्या विरोधात शेतकऱ्यांनी बंदचे आव्हाहन केले आहे. आंदोलनाचा आजचा १२ वा दिवस असून आज ‘भारत बंद’ला राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी देखील पाठिंबा दिला आहे.त्यामुळे आता संतापून भाजपा कडून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान देण्यात आले आहे.

‘महाविकास आघाडी कडून भारत बंदला पाठिंबा दिला जात आहे.या आघाडीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माझे आव्हान आहे की कृषी विधेयके ही शेतकरी हिताची कशी नाहीत? याचे विश्लेषण ठाकरे यांनी महाराष्ट्राला करून दाखवावे. कोणाकडूनही लिहून घ्या, पाठांतर करून या, कोथळा, मावळा असे सगळे शब्द त्यात घाला, पण तुम्ही विश्लेषण कराच,’असे आव्हान भाजपचे तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here