Marathwada Sathi

बिग- बींनी दिल्या टीम इंडियाला हटके शुभेच्छा

मुंबई : मेलबर्न कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून भारताने दणदणीत विजय मिळविला . अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केला. कर्णधार अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात नाबाद २७ धावा झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.ऑस्ट्रेलियाचे ७० धावांचे लक्ष्य टीम इंडियानं २ विकेट्सच्या मोबदल्यात पार केले.

टीम इंडियाच्या विजयानंतर बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनींही आनंद व्यक्त केला. त्यांनी ट्विट केलं की, ”भारताना दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं… सेटबॅकचं उत्तर कमबॅकनं देणार, मी बोललो होतो… दिलं, तेही त्यांच्या घरी घुसून. अभिनंदन टीम इंडिया.” अमिताभ यांच्या या ट्विटला १५ हजारांहून अधिक लाईक्स

Exit mobile version