Marathwada Sathi

भारतीय चाहत्यांकडून सोशल मीडियावर भन्नाट मिम्स शेअर ; ‘भाई ये विकेट गिरती क्यू नही’

मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटी सामना खेळवला जात आहे. अहमदाबाद येथील स्टेडियमवर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना पारपडत असून आज या सामन्याचा दुसरा दिवस आहे. परंतु दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची एकही विकेट काढण्यात भारतीय गोलंदाजांना यश येत नसल्याने भारतीय चाहते सोशल मीडियावर भन्नाट मिम्स शेअर करीत आहेत.अहमदाबाद येथील कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रलियाने प्रथम फलंदाजी करत 4 विकेट्स गमावून 255 धावा केल्या. यात उस्मान ख्वाजाने शतक ठोकले तरकॅमरुन ग्रीनही चांगल्या फॉर्मात दिसला. तर भारताकडून जाडेजा आणि अश्विन प्रत्येकी 1 तर शमीने 2 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलीयाच्या फलंदाजांना आपल्या घातक गोलंदाजीने तंबूत पाठवतील अशी आशा भारतीय चाहत्यांना होती. परंतु त्याउलट आज दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांना लंच ब्रेकपर्यंत एकही विकेट घेण्यात यश आले नाही. तेव्हा भारतीय संघाच्या या परिस्थीवर सोशल मीडियावर मिम्स शेअर करीत आहेत.

https://twitter.com/brb_memes7/status/1634080277927698432?s=20
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या मिम्सला चाहते लाईक आणि शेअर करीत आहेत.
Exit mobile version