Marathwada Sathi

27 जानेवारीपासून सुरू होतील 5 वी ते 8 वीच्या शाळा

मुंबई : आजपासून संपूर्ण देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सध्या सर्वीकडे लसीबाबत उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. त्यातच आता ५ वी ते ८ वीच्या शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. आता राज्यातील कोरोनाचा धोका हा कमी झाला असून यामुळे याच महिन्याअखेरीस पाचवी ते आठवीच्या शाळा देखील सुरु होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. नुकतंच शिक्षण विभागाची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.

त्यामुळे येत्या २७ जानेवारीपासून शाळा सुरु होणार अशी माहिती त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली. शाळा सुरु करताना विद्यार्थी आणि शिक्षक यांनी कोरोनाविषयक काळजी घ्यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आहे.

Exit mobile version