Marathwada Sathi

१४२३४ ग्राम पंचायत निवडणुकांचा वाजला बिगुल…!

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद- ६१८
बीड- १२९
नांदेड- १०१५
उस्मानाबाद- ४२८
परभणी- ५६६
जालना- ४७५
लातूर- ४०८
हिंगोली- ४९५

मुंबई : महाराष्ट्रात गावा-खेड्यापासून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापायला सुरुवात होणार आहे. राज्यातल्या १४२३४ ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या १४२३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून १५ जानेवारीला मतदान होणार आहे.

२३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. प्रत्यक्ष मतदान १५ जानेवारीला होईल आणि १८ जानेवारीला मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

कसा असेल निवडणूक कार्यक्रम?

निवड प्रक्रिया अशी असेल

३१ डिसेंबरला अर्जाची छाननी केली जाईल जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी वाजेपर्यंत असेल. निवडणूक चिन्ह तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी जानेवारी दुपारी वाजता प्रसिद्ध केले जाईल आणि १५ जानेवारी रोजी सकाळी साडे सात वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान होईल. १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे असे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

ठाणे- १५८, पालघर- ३, रायगड- ८८, रत्नागिरी- ४७९, सिंधुदुर्ग- ७०, नाशिक- ६२१, धुळे- २१८, जळगाव- ७८३, अहमनगर- ७६७, नंदुरबार- ८७, पुणे- ७४८, सोलापूर- ६५८, सातारा- ८७९, सांगली- १५२, कोल्हापूर- ४३३, औरंगाबाद- ६१८, बीड- १२९, नांदेड- १०१५, उस्मानाबाद- ४२८, परभणी- ५६६, जालना- ४७५, लातूर- ४०८, हिंगोली- ४९५, अमरावती- ५५३, अकोला- २२५, यवतमाळ- ९८०, वाशीम- १६३, बुलडाणा- ५२७, नागपूर- १३०, वर्धा- ५०, चंद्रपूर- ६२९, भंडारा- १४८, गोंदिया- १८९ आणि गडचिरोली- ३६२. एकूण- १४, हजार २३४

Exit mobile version